संघटन म्हणजे काय संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

संघटन म्हणजे काय संघटनेचे महत्त्व स्पष्ट करा?

संघटन ही एक अशी प्रक्रिया आहे, की ज्यायोगे विविध कार्ये, संसाधने, व्यक्ती, पैसा एकत्रितरीत्या एका व्यवस्थेत आणली जातात. प्रत्येक बाबींची क्रमवार व्यवस्था लावणे व वित्त, यंत्रे, वस्तू, मानवीशक्ती इत्यादी साधनांचा संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयोग करणे. हे कार्य वरिष्ठ व्यवस्थापनाकडून केले जाते. जेव्हा व्यवस्थापक संघटन प्रक्रियेचे कार्य पार पाडतात, तेव्हा संघटन तयार होऊन कार्यव्यवस्थेस आकार निर्माण होतो. संघटन कार्य हे नियोजनाद्वारे निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याचे माध्यम व मार्ग आहे.

एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात.

अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही.तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना. हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे संघटना नव्हे;तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी ईमान राखणारे शिलेदार म्हणजे संघटना होय.

सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान,राग,लोभ,आरोप, प्रत्यारोप होणारच.वैचारिक मतभेद तर अपरिहार्यच परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काही टिकून राहते;ते म्हणजे संघटना.

म्हणून संघटित होऊ संघर्ष करु.अन्यायावर मात करु.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथात दोन ओळींत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात…

हत्तीस आवरी गवती दोर!
मुंग्याही सर्पास करती जर्जर!!
रानकुत्रे संघटोनी हुशार!
व्याघ्र-सिंहासी फाडती!!

यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो.असे म्हणतात की,मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.समाजात (समूह) राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते.

जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान आणि श्रीमंत असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे जाऊन समाजाला त्याचा काहीही उपयोग होत नाही.म्हणूनच प्रत्येकाच्या समाज जीवनात संघटनेचे अनन्य साधारण असे महत्व आहे.

जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जोडलेली असते त्या त्या व्यक्तींना लोक आपुलकीने ओळखतात.काही ठिकाणी तर इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळतो.काही व्यक्ती संघटनेत खूपच कार्यरत असतात.त्यांना कमी कालावधीत जास्त प्रसिध्दी मिळते.संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली,नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते.त्यांना पद,प्रतिष्ठा, प्रसिद्धी,पत मिळायला लागते.काही लोकांच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते.ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात.त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो.माझ्यामुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते.मीच या संघटनेला मोठे केले असा अहंभाव किंवा न्यूनगंड त्याच्यात निर्माण होतो.मग त्या व्यक्तीचे संघटनेतील वागणे, बोलणे, चालणे पूर्णपणे बदलून जाते.

ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो मोठा झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो.त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो.त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो.आता त्याचा कार्यरतपणा पूर्णतः बदललेला असतो आणि इथूनच मग त्याच्या विनाशाला सुरुवात होते.

जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते.

संघटनेत काही ज्ञानी वक्ते, लेखक, प्रचारक असतात.त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात.त्यामुळे अशी ज्ञानी मंडळी संघटनेचे जसे वैभव असतात तसे कार्यकर्ते देखील संघटनेचा प्राण असतात, त्यामुळे ही दोन्ही मंडळीं तितकीच महत्वाची असतात.

संघटनेत वक्ता,लेखक किंवा प्रचारक आणि कार्यकर्ता या दोहोंमध्ये उत्तम संवाद आणि समन्वय असणं खुप गरजेचे असते.काही विसंवाद निर्माण होऊ नये याची पूर्व काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं असतं. झालाच तर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त ताणू देवू नये याचीही काळजी घ्यायला हवी.

संघटनेत सर्वांना तितकेच महत्व आहे याचेही भान असलं पाहिजे.नाहीतर अहंकार उत्पन्न अशी काही मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात त्या व्यक्तीची महत्वकांक्षा प्रचंड वाढायला लागते.तो मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा एखाद्याचा भ्रम होतो.

संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो,बोलायला लागतो,कार्यकर्त्यांच्या मनात नेतृत्वा विरुध्द खोटे,नाटे भरवलं जातं आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न होतो.

बरेचसे कार्यकर्ते हुशार, समजूतदार आणि निष्ठावंत असल्यामुळे अशा कारस्थानाला बळी पडत नाहीत.उलट अशांना संघटनेविषयीची आत्मियता मोठया अधिकार वाणीने सांगतात.एवढंच नाही तर अशा चुकीच्या कार्यकर्त्यांच्याविषयी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील त्याच्याबद्दल असलेली आत्मियता हळू हळू कमी होवून जाते.

अशावेळी थोडं मागे वळून पाहिल्यावर मग काहींचे डोळे उघडतात,झाल्या चुकीची समज येते,संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण आहोत याची जाणीव होते.पण या जाणिवे पर्यंत थोडी अधिकची वेळ हि निघून गेलेली असते.अशावेळी धन,दौलत,पैसा कितीही मिळाला तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला परत कधीच मिळू शकत नाही.

पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो.दिलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडतो,संघटना प्रमुख आणि सोबतच्या सर्व सहकार्यांप्रती आदरभाव राखून असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते.संघटनेला वाहून घेणारा या दृष्टीनेच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. म्हणून संघटनेत काम करणा-या प्रत्येकानी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे. संघटनेत रुसवे,फुगवे,नाराजी, वादविवाद चालतच असतात.पण ज्या संघटनेमुळे आपल्याला सर्वकाही मिळाले त्याच्या सोबत मात्र कधीही स्वतःहून रुसू नये. नाहीतर संघटनेच्या इतिहासात प्रत्येकाची जशी अलौकिकत्वाची नोंद होतं असते तशी आपलीही आगळी वेगळी नोंद होत असते हे ध्यानात ठेवावे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 4150 +22