प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते?www.marathihelp.com

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्याच्या जोडीला महाराष्ट्रात अस्पृश्यतेची पद्धत स्त्री शिक्षणा वरील बंदी अशा विविध कारणांमुळे हिंदू समाजात दुरावस्था माजली अशा समाजाला दूर अवस्थेतून बाहेर काढण्याचा अनेक सुधारकांनी प्रयत्न केला महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या सामाजिक सुधारणेचा एक भाग म्हणजेच प्रार्थना समाजाची स्थापना होय प्रार्थना समाजाचा उदय कशा प्रकारे झाला याविषयी विविध विचारवंतांनी विविध मते मांडलेली आहेत व्ही. के. नाईक यांच्या मते परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या उद्देशाने प्रार्थना समाजाची स्थापना झाली अशा अनेक सभा आणि संघटना महाराष्ट्रमध्ये उभ्या राहिल्या आणि त्यातूनच सामाजिक सुधारणेला चालना मिळालीप्रार्थना समाज या संस्थेची स्थापना डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग या तर्खडकर बंधूंनी दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी मुंबईत केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड (जुने नाव सॅंडहर्स्ट रोड) आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे.


प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.
प्रार्थना समाजाचे कार्य

प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली.
श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.
प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन:

प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले.

त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते.

त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.
प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर

सरोजिनी कराडे
विकास काटदरे
ग.ल. चंदावरकर
न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर
मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर
वासुदेव बाबाजी नवरंगे
सदाशिव पांडुरंग पंडित
मामा परमानंद
अभय पारसनीस
प्राच्यविद्यापंडित सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर
वामन आबाजी मोडक
सिद्धार्थ राजाध्यक्ष
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
डॉ. सुनीलकुमार लवाटे
बाळ मंगेश वागळे

solved 5
सामाजिक Thursday 8th Dec 2022 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 5963 +22