Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
पहिले भारतीय समाजशास्त्रज्ञ कोण होते?
आधुनिक समाज शास्त्राचे जनक :
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.
१. लेस्टर वार्डः
‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.
२. फ्रॅन्कलीन गिडिंगजः
समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.
३. आगबर्न व निमकाॅकः
”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र असे म्हणतात.“
येथे समाजाचे शास्त्रीय रितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.
४. मॅक आयव्हर व पेजः
समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.
५. मार्षल जोन्सः
समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.
६. हॅरी जाॅन्सनः
समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो.
७. मॅक्स वेबरः
समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.
८. अल्केष इकेल्सः
समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारंपारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रूप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.
व्यवस्थाबद्द ज्ञान समुच्चयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.
नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.
थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाशी निगडित असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.
शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्शनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.
आदर्श प्रमाणभूत मानून अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नीतिशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे.
समाजशास्त्र एक आधुनिक शास्त्र
समाजशास्त्राचा आरंभाचा काळ लक्षात घेता असे स्पष्ट होते की ते एक आधुनिक शास्त्र असे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इ. शास्त्रांना जसा दीर्घ इतिहास आहे. तसा दीर्घ इतिहास समाजशास्त्राला नाही. समाजशास्त्राची वाटचाल 150-175 वर्षांची आहे. परंतु, या शास्त्राचा अभ्यासविषय मानवी समाजाइतकाच प्राचीन आहे.
समाजाचे अध्ययन प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व इतर देशात करण्यात येत होते. यासंबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
1. ग्रीक देशात प्लेटो व ॲरीस्टाॅटल यांनी रिपब्लिक व पाॅलिटिक्स हे ग्रंथ लिहीले. या ग्रंथात समाज, राज्य व कायदा याविषयी सविस्तर विश्लेषण आहे.
2. रोमन तत्त्वज्ञा सिसेरी यांनी हा ग्रंथ व मॅकवेलचा या ग्रंथात समाज जीवनावर प्रकाश टाकला आहे.
3. भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या ग्रंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मियांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते.