Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
श्री. गुलजारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1998 रोजी पंजाबच्या सियालकोट येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (1920-1921) श्रम संबंधी समस्यांवर संशोधक म्हणून काम केले. 1921 मध्ये ते नॅशनल महाविद्यालय (मुंबई) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचवर्षी ते असहकार चळवळीत सामील झाले. 1922 मध्ये ते अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनचे सचिव झाले आणि तिथे 1946 पर्यंत काम केले. 1932 मध्ये सत्याग्रहासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले आणि पुन्हा 1942 ते 44 दरम्यान ते तुरुंगवासात होते.
1937 मध्ये मुंबई विधानसभेवर ते निवडून गेले आणि 1937 ते 1939 पर्यंत मुंबई सरकारचे संसदीय सचिव (श्रम आणि उत्पादन शुल्क) होते. नंतर मुंबई सरकारचे श्रममंत्री (1946 ते 1950) म्हणून त्यांनी राज्य विधानसभेत यशस्वीपणे श्रम तंटा विधेयक सादर केले. त्यांनी कस्तुरबा मेमोरिअल ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून, हिंदुस्तान मजदूर सेवक संघाचे सचिव म्हणून तसेच मुंबई गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. राष्ट्रीय नियोजन समितीचेही ते सदस्य होते. राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या आयोजनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि नंतर ते याचे अध्यक्ष बनले.
1947 मध्ये जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेत एक सरकारी प्रतिनिधी म्हणून ते सहभागी झाले. त्यांनी परिषदेद्वारे नियुक्त “द फ्रीडम ऑफ असोसिएशन समिती”वर काम केले आणि स्वीडन, फ्रान्स, स्वितझर्लंड, बेल्जिअम आणि इंग्लंड या देशांचा तेथील श्रम आणि गृहनिर्माण स्थितीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला.
मार्च 1950 मध्ये, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून ते रुजू झाले. पुढल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारमध्ये त्यांची नियोजन मंत्री म्हणून नियुक्ती झाली. याशिवाय त्यांना सिंचन आणि ऊर्जा विभागांचा कार्यभारही सोपवण्यात आला. 1952 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले आणि पुन्हा नियोजन, सिंचन आणि ऊर्जा मंत्री झाले. 1955 मध्ये सिंगापूरमध्ये आयोजित नियोजन सल्लागार समिती आणि 1959 मध्ये जिनिव्हा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेमध्ये त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
1957 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले आणि केंद्रीय श्रम, रोजगार आणि नियोजन मंत्री झाले. नंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1959 मध्ये त्यांनी जर्मनी प्रजासत्ताक, युगोस्लाव्हिया आणि ऑस्ट्रियाचा दौरा केला. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत गुजरातमधील साबरकांठा मतदारसंघातून ते पुन्हा लोकसभेवर निवडून आले. 1962 मध्ये समाजवादी लढयासाठी त्यांनी काँग्रेस फोरमची सुरुवात केली. 1962 आणि 1963 मध्ये ते केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री तर 1963 ते 1966 दरम्यान गृहमंत्री होते.
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर 27 मे 1964 रोजी नंदा यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ताश्कंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर 11 जानेवारी 1966 रोजी पुन्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.